…तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरात बसावे – उद्धव ठाकरे

…तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरात बसावे – उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस रसातळाला जायला गांधी परिवार जबाबदार नाही तर त्याला काँग्रेसचे जुने नेतेच कारणीभूत आहेत. या काँग्रेस नेत्यांना जर आपला अध्यक्ष निवडता येत नसेल तर त्यांनी आपल्या कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरातच बसावे असा सल्लाही उद्धव यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

दरम्यान काँग्रेस ही संघटनाच आता कोसळून गेली आहे. देशासमोर मोठे प्रश्न असताना जनता आशेने विरोधी पक्षांकडे बघत असते. मात्र, काँग्रेसचे नेते राहुल गांधींचीच मनधरणी करण्यात व्यस्त आहेत. विरोधी पक्षाची आपली जबाबदारी सक्षमपणे सांभाळण्याबाबतही कोणाला काही वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसची आजची स्थिती म्हणजे त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे मिळालेले फळ असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे नेतेच सध्या गांधी परिवाराचा छळ करीत आहेत. घराणेशाहीच्या सावलीतून बाहेर पडावे असे राहुल गांधींनी ठरवले मात्र, त्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांना घराणेशाहीच्या सावलीत बसायचे आहे त्यांना उन्हात काम करायचे नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS