जे नको ते मतदारांनी नाकारले – उद्धव ठाकरे

जे नको ते मतदारांनी नाकारले – उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच राज्यांमधील निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. त्यामुळे जे नको ते मतदारांनी नाकारले असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच चार राज्यातील मतदारांचं उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. ईव्हिएम, पैसे वाटप, गुंडगीरी आणि पर्याय कोण या सगळ्यात न पडता मतदारांनी जे नको आहेत त्यांना उखडून फेकले असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

11bdm1 Saheb

दरम्यान चार राज्यात परिवर्तन घडवणा-या मतदारांच अभिनंदन करतो. मतदारांच हे धाडस म्हणजे देशाला दाखवलेली दिशा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनच भाजपवर टीका केली असल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

COMMENTS