सरकार कुणाचेही असाे, असले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत –  उद्धव ठाकरे

सरकार कुणाचेही असाे, असले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत – उद्धव ठाकरे

मुंबई – दिल्लीतील जेएनयूमधील हल्ला हा मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यासारखा असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. बुरख्याआडचा चेहरा कुणाचा ?, सरकार कुणाचेही असाे, असले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. देशाच्या संस्कृतीला अनुसरून युवकांना विश्वासात घ्यायला हवं. युवक हॉस्टेलमध्ये सुरक्षित नसतील तर धाेक्याचे आहे.
महाराष्ट्रात हे घडू देणार नाही,आपल्या केसालाही धक्का लावणाऱ्यांवर कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

दरम्यान युवकांमध्ये जी अस्थिरता निर्माण झालीय ती दूर करणे गरजेचं आहे. बुरखाधारी हे डरपाेक, बुरखा का बांधता ? हिंमत नाही का ?, हे कायर आहेत, कायरतेचे समर्थन कधीच हाेणार नाही. राज्यात चिंता करायची गरज नाही, बुरख्यामागचा चेहरा उघड व्हायला हवा असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. पाेलीस जर कारवाई करणार नसतील त्यांच्यावर शंका उपस्थित हाेतील.युवाशक्ती म्हणजे युवाबॉम्ब आहेत, त्याला जागवू नका असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS