‘त्या’ नामर्दाच्या औलादींना ठेचून काढू- उद्धव ठाकरे

‘त्या’ नामर्दाच्या औलादींना ठेचून काढू- उद्धव ठाकरे

अहमदनगर  अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी उध्दव ठाकरे यांनी अखेर मौन सौडलं असून अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या मारेक-यांना फासावर लटकवले पाहिजे असं म्हटलं आहे.शिवसैनिकांचे मारेकरी फासावर लटकायला हवेतच. पण सूत्रधार किंवा सुपारी देणारेही फासावर लटकले पाहिजेत. असंही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज अहमदनगर दौ-यावर असताना ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान शिवसैनिकांना मारणारे सत्ताधारी पक्षाचे का असेनात त्यांना फासावर लटकवले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. मृत शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाख 50 हजार रुपयांची मदत त्यांनी दिली आहे. हल्लेखोर नामर्द आहेत. एकट्याला गाठून, गोळ्या घालून, ते कमी काय म्हणून त्यांचा गळा चिरुन हत्या केली जाते. ह्या नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू. त्यासाठी  मुख्यमंत्र्यांना जाहीर आवाहन करतो की, राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

COMMENTS