त्यांना जमल नाही म्हणून गृहमंत्र्यांना शिवसेना संपवण्याची सुपारी दिली

त्यांना जमल नाही म्हणून गृहमंत्र्यांना शिवसेना संपवण्याची सुपारी दिली

मुंबई – देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना संपविण्याचे,हे जे वाक्य आहे ते त्यांनी नारायण राणे यांच्या कार्यक्रमात उच्चरले त्या वेळेस नारायण राणे यांना सुद्धा हसू आवरले नसेल. नारायण राणे त्यांनी मागील पंधरा वर्ष शिवसेना संपविण्याचा विडा उचलला होता. पण त्यांना काही जमलं नाही. म्हणून त्यांनी अमित शहा यांना आपल्या गावात बोलावून शिवसेना संपविण्याची सुपारी दिली.आणि म्हणून अमित शहा असे बोलले असतील, असं मला वाटले, असे म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना चिमटा काढला.

अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात शिवसेनेवर केलेल्या टिकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पत्र लिहीले. यामध्ये त्यांनी म्हटल आहे की, एक गुजराती माणूस महाराष्ट्रत येऊन, मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी जन्माला आलेल्या शिवसेनेला संपविण्याचे वाक्य बोलतो, आणि नारायण राणे सकट कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण मराठी जण या वाक्क्याला टाळ्या वाजवण्यासारखं मराठी माणसाच दुसरं दुर्दैव नसेल.

जे शिवसैनिक आहेत त्यांना माझ एक सांगणे आहे की आताची लढाई ही रस्त्यावरची राहिलेली नाही, आता तुमचा सर्व विषयांचा अभ्यास दांडगा पाहिजे, तरच तुम्ही राजकारणात पुढच्या माणसाला गप्प करू शकता, असे आवाहन केले.

COMMENTS