फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया!

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया!

मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
विधानसभा निकालादिवशीच आपण पत्रकार परिषदेसाठी इथे भेटलो होतो. आज थोड्यावेळापूर्वी मी महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली. त्यांनी मागील 5 वर्षात जे अचाट कामं केली ते सांगितली. मी त्यांना धन्यवाद देतो. आम्ही त्यांच्यासोबत 5 वर्ष राहिलो नसतो तर त्यांना ती करता आली नसती. म्हणजेच आम्ही विकासाच्या आड आलो नाही. आम्ही शब्द पाळतो. बाळासाहेबांकडून मी तेच शिकलो असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.

दरम्यान लोकसभेच्यावेळी युतीसाठी मी दिल्लीत गेलो नव्हतो ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यासाठी मी लाचार नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचं वचन दिलं होतं. ते मी पूर्ण करणार. त्याच्यासाठी भाजप, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांची गरज नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांचा राजीनामाफडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

भाजपचे विधानसभेतील गट नेते आणि हंगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, मुंबईत राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीस यांनी आमच्यापुढं सगळे पर्याय खुले आहेत, असं वक्तव्य आम्ही केलं नाही. उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यामुळं आमच्यासाठी हे विधान धक्कादायक होतं. लोकांनी महायुतीला मतदान केलं होतं.

मी पहिल्याच पत्रकार परिषदेत महायुतीचं सरकार स्थापन होईल, असं म्हटलं होतं. पण, गेल्या पंधरा दिवसांत ज्या पद्धतीनं, ज्या भाषेत वक्तव्यं झाली. त्यामुळं परिस्थिती चिघळत गेली. माझ्या समोर अडीच वर्षांचा कधीही निर्णय झालेला नव्हता. या विषयावर एकदा बोलणी फिस्कटली होती. त्यानंतर जेव्हा चर्चा झाली तेव्हा माझ्या उपस्थितीत कधीच अडीच वर्षांचा विषय झाला नसल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS