‘त्या’ निर्णयापासून आता माघार नाही -उद्धव ठाकरे

‘त्या’ निर्णयापासून आता माघार नाही -उद्धव ठाकरे

नाशिक – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. स्वबळावर निवडणूक लढणार, या निर्णयापासून माघार घेणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जिथे जिंकू, त्या तीन जागांवर उमेदवार दिले आहेत. स्थानिक पातळीवर जे जमेल ते करा, असे आदेश विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान सीमा भागातील मतदारांनी दुही न माजविता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागे उभे राहण्याचा आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसेच या भागात शिवसेना उमेदवार देणार नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच कोकणातील नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून सरकारने कितीही प्रयत्न केले तरी हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

COMMENTS