विधानपरिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध, भाजपकडून ‘हे’ घेणार अर्ज मागे ?

विधानपरिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध, भाजपकडून ‘हे’ घेणार अर्ज मागे ?

मुंबई –  विधानपरिषदेच्या ११ जागांची निवडणूक अखेर बिनविरोध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ११ जागांच्या निवडणुकीसाठी एकूण १२ अर्ज आल्याने या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु भाजपकडून पृथ्वीराज देशमुख हे उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती आहे. भाजपाच्या या निर्णयामुळे महादेव जानकर यांना दिलासा मिळणार असून कॅबिनेट मंत्री असलेले जानकर यांनी भाजप ऐवजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

दरम्यान आकरा जागा असताना त्यापेक्षा एकही अर्ज कायम राहिला आणि अर्जांची संख्या १२ किंवा त्यापेक्षा अधिक राहिली तर, निवडणूक अटळ आहे अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु याबाबत भाजप आज बैठक घेणार असून या बैठकीनंतर निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. तसेच उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेटवची तारीख असल्यामुळे भाजपकडून कोणाचा अर्ज मागे घेतला जाईल हे उद्याच समजणार आहे.

 

COMMENTS