मुंबईतील पूर सदृश्य परिस्थितीवर मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया !

मुंबई – मुंबई शहर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. शहरातील जनजीवन यामुळे विस्कळीत झालं आहे. यावर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कालपासून मुंबई, ठाणे, पालघर यासह राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पाणी तुडुंब भरत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरात राहावे. या संपूर्ण परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तयार करण्यात आल्या असून आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेऊन असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS