विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा!

मुंबई – काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये गेलेल्या
गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खळबळजनक दावा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादीचे अनेकजण संपर्कात आहेत. काहीजण भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर अनेक जण नाराज आहेत. म्हणूनच मी स्वतः भाजपमध्ये आलो. येत्या काळात भाजप प्रवेशासाठी अनेकजण उत्सुक आहेत. काही जण संपर्कात आहेत. मात्र पक्ष अंतिम निर्णय घेईल असंही विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सध्याचं सरकार अनेक रखडलेली कामं करत आहे. आरक्षणाचा मुद्दा असो वा अन्य मुद्दे मुख्यमंत्र्यांनी निकाली लावले आहेत. सरकार सकारात्मक भूमिका घेतं, त्यामुळे सर्वांना सरकारबद्दल आकर्षण आहे. काँग्रेसमुक्त महाराष्ट्र माझ्यासाठी मुद्दा नाही. प्रत्येक पक्षाला भूमिका असते, धोरणं असतात. राजकीय पक्षाबाबत मी काही भाष्य करणार नसल्याचंही विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते सोलापुरात बोलत होते.

COMMENTS