‘बाळराजें’च्या मित्रांना वाचवण्यासाठी कमला मिलमध्ये तोंडदेखली कारवाई – विखे पाटील

‘बाळराजें’च्या मित्रांना वाचवण्यासाठी कमला मिलमध्ये तोंडदेखली कारवाई – विखे पाटील

मुंबई – कमला मिल कम्पाऊंडमध्ये शुक्रवारी लागलेल्या आगीनंतर महापालिकेनं अनधिकृत बांधकामाविरुद्ध तोडक कारवाई सुरु केली आहे. परंतु ही कारवाई हा केवळ फार्स असून प्रत्यक्षात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या हॉटेल्सचे मालक हे ‘बाळराजें’चे जिवश्च कंटच्च मित्र आहेत. त्यांना या प्रकरणातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांचे निलंबन आणि बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची तोंडदेखली कारवाई सुरु असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवणी केली आहे.

दरम्यान विखे पाटील यांनी शनिवारी कमला मिल कंपाऊंडमधील घटनास्थळाची पाहणी केली.त्यावेळी त्यांनी भाजप व शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘मोजेस ब्रिस्ट्रो’ व ‘वन अबव्ह’या दोन्ही हॉटेल्समध्ये बेकायदा व असुरक्षित बांधकाम झाल्याची पूर्ण माहिती महानगरपालिकेला होती. परंतु १४ निरपराध मुंबईकरांचे बळी जाईपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराचे मागील पाच महिन्यात 75 बळी गेले आहेत. त्यामुळे फक्त अधिकाऱ्यांना निलंबित करून अशा घटना थांबणार नाहीत तर मुंबई महापालिकेत तयार झालेली भ्रष्ट अधिकाऱ्यांची, दलालांची आणि त्यांना राजाश्रय देणाऱ्यांची टोळी उद्धस्थ झाली पाहिजे असे विखे-पाटील म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावणाऱ्या भाजपने आता जागे झाले पाहिजे असा टोला लगावत त्यांनी राज्याची सत्ता टिकवण्यासाठी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचे पाप मुख्यमंत्र्यांनी करु नये असही ते म्हणाले.मुंबई महापालिकेत रुफ टॉपवर बसून नाईट लाईफच्या गप्पा करणाऱ्यांना आता जमिनीवर आणण्याची वेळ आली आहे असंही विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS