मोदी, शाह, फडणवीस यांच्यामुळेच सांगलीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जिंकले – विनोद तावडे

मोदी, शाह, फडणवीस यांच्यामुळेच सांगलीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जिंकले – विनोद तावडे

सांगली – सांगली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे जिंकले असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. महापालिकेतील विजयाबाबत तावडे यांनी भाजपच्या नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनाही पत्र लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रामध्ये तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कामाच्या आणि संघटन कौशल्यामुळे आपला विजय झाला असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान तावडेंच्या या पत्रानंतर राष्ट्रवादीने जोरदार टीका करत तावडेंना पत्राद्वारेच प्रत्युत्तर दिलं आहे. तावडे साहेब तुम्ही नेहमी बौद्धिक दिवाळखोरी दाखवत असता आणि आमचे नगरसेवक पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांच्यामुळे नव्हे तर फक्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामुळेच निवडून आले असल्याचं राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संजय बजाज यांनी म्हटलं आहे.

COMMENTS