पगड्या बदलणा-यांना उत्तर देण्याचे कारण नाही, विनोद तावडेंची शरद पवारांवर टीका !

पगड्या बदलणा-यांना उत्तर देण्याचे कारण नाही, विनोद तावडेंची शरद पवारांवर टीका !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जोरदार टीका केली आहे. पगड्या बदलमा-यांना उत्तर देण्याचं कारण नसल्याची टीका तावडे यांनी केली आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर शरद पवार यांच्यासारखी अभ्यासू माणसे खूप राजकीय बोलतात. त्यांच्या राजकीय पत्र व्यवहाराला उत्तर द्यायचे कारण नसते. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील बहुजन समाजामधील विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, याकडे आमचे लक्ष आहे.त्यामुळे बहुजन समाजाच्या मतावर डोळा ठेवून, जे पगड्या बदलतात, त्यांना उत्तर देण्याचे कारण नसल्याचं तावडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शाळाबंदीचा निर्णय या सरकारने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयापैकी वाईट निर्णय होता, असे वक्तव्य पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यावर तावडे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर शरद पवार यांच्यासारखी अभ्यासू माणसे खूप राजकीय बोलतात. त्यांच्या राजकीय पत्र व्यवहाराला उत्तर द्यायचे कारण नसते असं तावडे यांनी म्हटलं आहे. तसेच लवकरच प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविली जाणार असून  शुल्क नियंत्रण कायदा अंतिम टप्प्यात असून, येत्या अधिवेशनात त्याची घोषणा होण्याची शक्‍यताही तावडे यांनी वर्तवली आहे.

 

COMMENTS