भाजप आमदार म्हणतोय, विराट – अनुष्का देशभक्त नाहीत !

भाजप आमदार म्हणतोय, विराट – अनुष्का देशभक्त नाहीत !

भारताचा क्रिकेट स्टार विराट कोहली आणि बॉलिवूड गर्ल अनुष्का शर्मा यांच्या झालेल्या लग्नाची देशभरात मोठी चर्चा झाली. दोघांनी इटलीत जाऊन लग्न केलं. लग्नानंतर त्यांची सोशल मीडियावर त्याचे फोटो टाकले. त्याची सर्वच माध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली. त्यांचा ड्रेस, लग्नाची पद्धती, इटलीत ज्या ठिकाणी लग्न होते, त्या रिसॉर्टच भाडं यासह लग्नातल्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची माध्यमांमधून अत्यंत चवीनं चर्चा झाली.

मात्र विराट अनुष्कानं इटलीत लग्न करणं भाजपच्या एका आमदाराला अजिबात पटललेलं नाही. देशातल्या जनतेनं त्यांना एवढं प्रेम दिलं. जगात ते भारताचं प्रतिनिधीत्व करतात. त्यांना मान सन्मान दिला. मात्र त्यांनी इटलीत जाऊन लग्न का केलं असा सवाल भाजपाचे मध्य प्रदेशातील आमदार पन्ना लाल यांनी केला आहे. त्यांचं हे वागणं म्हणज्ये राष्ट्रभक्ती नाही अशा शब्दात आमदार महोदयांनी नाराजी व्यक्त केलीय.

आता या आमदार महोदयांच्या प्रतिक्रियेवर काही प्रतिक्रिया येतात का ते पहावं लागेल. खरंतर लग्न हा प्रत्येकाचा खाजगी मुद्दा आहे. कुणी कुठे लग्न करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर त्यांच्या देशभक्तीचं मोजमाप करणं चुकीच आहे.

COMMENTS