चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया!

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया!

मुंबई – काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एखादा भाजपामध्ये सहभागी झाला तर आश्चर्य वाटायला नको, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांचे हे विधान हास्यास्पद असल्याचे विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे.चंद्रकांत पाटील हे सतत असे विधान करत असतात. ते एक ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्या खांद्यावर आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. ते सतत अशी विधाने का करतात हे त्यांनाच ठाऊक, आपण यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. पतंगराव कदम यांनी पक्षात चार दशकं काढली. त्यामुळे यापुढेही आपण काँग्रेसच्या विचारांशीच काम करणार असल्याचं कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांची नुकतीच भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी काल पहिल्यांदा सर्वांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपामध्ये सामिल झाल्यास आश्चर्य वाटालयला नको, असे विधान केले होते. त्यावर कदम यांनी टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांचे हे विधान हास्यास्पद असल्याचे विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे.[/lock

COMMENTS