नाव शिवाजी महाराजांचं घेतात आणि काम अफजलखानाचं करतात, योगींची शिवसेनेवर जोरदार टीका !

नाव शिवाजी महाराजांचं घेतात आणि काम अफजलखानाचं करतात, योगींची शिवसेनेवर जोरदार टीका !

विरार – पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी आज उत्तर प्रदेशाचे मुख्यंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे पुरातन काळापासून अत्यंत चांगले संबंध आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकासाठी गागा भट्ट काशीवरुन आले होते. तर उत्तर प्रदेशाचे राज्यपाल हे महाराष्ट्रातील आहेत. दोन्ही राज्यातली जनता गुण्यागोविंदाने नांदत आहे. मात्र काही लोक त्यांच्यात भांडण लावण्याचा प्रय़त्न करत आहेत. हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. असे लोक शिवाजी महाराजाचं नाव घेतात आणि कृत्य मात्र अफजलखानासारखं करतात या शब्दात शिवसेनेवर हल्लाबोल केला.

बाळासाहेबांनी मित्राच्या पाठित कधीच खंजीर खुपसला नाही. सध्याच्या शिवसेनेनं वनगा कुटंबियाच्या प्रकरणात नाक खुपसण्याची गरज नव्हती. अशी टीकाही योगी आदित्यनाथ यांनी केली. त्यांच्या टीकेचा रोख हा पूर्णपणे शिवसेनेवर होता. राज्य कसं चालवावं याचा आदर्श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिला असल्याचंही योगी म्हणाले. विरार पट्ट्यातील उत्तर भारतीय मतांवर डोळा ठेऊन भाजपनं योगींची सभा आयोजित केली होती. आता त्याचा किती फायदा होतो हे निकालानंतर स्पष्ट होईल.

COMMENTS