स्वच्छ सर्वेक्षणामधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यातील ‘या’ दोन जिल्हा परिषदांचा दिल्लीत होणार गौरव !

स्वच्छ सर्वेक्षणामधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यातील ‘या’ दोन जिल्हा परिषदांचा दिल्लीत होणार गौरव !

मुंबई – स्वच्छ सर्वेक्षणामधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यातील दोन जिल्हा परिषदांचा दिल्लीत गौरव केला जाणार आहे. राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधून सोलापूर आणि नाशिक या दोन जिल्हा परिषदांचा गौरव केला जाणार असून दोन ऑक्टोबर रोजी होणा-या सन्मान सोहळयासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात २०१८ वर्षात स्वच्छ सर्वेक्षणामध्ये या दोन्ही जिल्हा परिषदांनी प्रभावी अमंलबजावणी केली होती.

दरम्यान केंद्रशासनाच्या केंद्रीय समितीकडून सोलापूर जिल्हयातील १६ ग्रामपंचायतीची स्वच्छता,घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेची लोकांमधील जागृती, शालेय स्वच्छता,अंगणवाडी स्वच्छता,वैयक्तीक स्वच्छता,याबाबत सर्वेक्षण करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणानंतर सोलापूर आणि नाशिक या दोन जिल्हा परिषदांचा गौरव केला जाणार आहे.

COMMENTS