सीबीआयला एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल – गृहमंत्री अनिल देशमुख

सीबीआयला एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई – राज्यात सीबीआयला एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा आदेश काढण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. सीबीआयचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातो असं बोलले जाते. सीबीआय ही अत्यंत प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे, पण त्यांचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका आहे. त्यामुळे राज्य सरकारने सीबीआयची महाराष्ट्रात नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान टीआरपी बाबत मुंबई पोलिस चौकशी करत आहेत. राजकीय दबाव आला तर यामध्ये सुद्धा सीबीआय तपास करेल. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक सर्वांना माहिती आहे, तरी त्यांना बदनाम करण्याचं काम केलं. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र, मुंबई पोलीस जो तपास करत होते, त्याचा तपास सीबीआयने घेतला, TRP घोटाळ्याच्या तपासातही तसंच झालं, त्यामुळे यापुढे सीबीआय हस्तक्षेप करु शकणार नाही.अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

COMMENTS