पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली घोषणा !

पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली घोषणा !

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक आज पार पडली. आज पूर व अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आज वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते.

या बैठकीत पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीनं वितरित करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसंच राज्याचे केंद्राकडे ३८ हजार कोटी थकीत असून केंद्रानं अजूनही ही रक्कम दिली नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकय्रांचं मोठं नुकसान झालं आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनीही विविध भागातील पाहणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

शेती, फळपिकांसाठी हेक्टरी वाढीव मदत देण्यात येणार आहे. एकूण केंद्राकडून येणं 38 हजार कोटी रुपये आहे पण मिळालेले नाहीत. अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे. या आपत्तीत 10 हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे.

दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल. पैशाची ओढाताण आहे,पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे. जिरायत, बागायत जमिनीसाठी 6800 प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी 10 हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे. फळपिकांसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर ऐवजी 25 हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS