‘या’ “संताजी- धनाजींची फडणवीसांना वाटते भीती”

‘या’ “संताजी- धनाजींची फडणवीसांना वाटते भीती”

इतिहासात जशी मोघलांना संताजी धनाजींची भीती वाटायची तसं आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भीती वाटत असल्याची टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. राज्यात काहीही घडलं की मुख्यमंत्र्यांना त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात असल्याचा भास होत असल्याचा टोला फडणवीसांना हाणला. शेतक-यांचा संप हा निव्वळ शेतक-यांनी पुकारलेला आहे. त्याला कोणाचीही फूस नाही. शेतक-यांना बदनाम करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी करु नये असंही जयंत पाटील म्हणाले. शेतकरी संपाला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्र्यांनी धसका घेतला आहे. त्यामुळे ते बेछुट आरोप करत असल्याची टीकाही पाटील यांनी केली.

संप फोडण्याचे आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची एकजुट मोडण्याचे काम एका राज्यमंत्र्याला हाताशी धरून मुख्यमंत्री  फडणवीस  करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संताप अजुन उफाळून येईल. हे सर्व वेळीच थांबण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलदार पनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ़ी करावी. शेतकऱ्यांना आणखीन वेठीला धरु नये असे जयंत पाटील म्हणाले.

COMMENTS