राजू शेट्टीच्या आत्मक्लेष यात्रेमुळे मुंबईत वाहतूक कोंडी

राजू शेट्टीच्या आत्मक्लेष यात्रेमुळे मुंबईत वाहतूक कोंडी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. ही यात्रा चेंबूरहून दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाली असून सर्वसामान्य मुंबईकर मात्र, हैराण झाले आहेत. कारण पनवेल-सायन मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे मानखुर्दपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

आत्मक्‍लेश यात्रेत राजू शेट्टींची प्रकृती खराब झाल्याचे चित्र दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालावली आहे. आत्मक्लेश यात्रेनिमित्त त्यांनी 100 किमीहून अधिक पायी प्रवास केल्यामुळे त्यांच्या पायाला फोड आले आहेत आणि पाय सूजले आहेत. खासदार राजू शेट्टी यांचा रक्तदाबही कमी झाला असून, डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. शेट्टी यांना आरामाची गरज आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

दरम्यान सदाभाऊ खोत सध्या सत्तेत आहेत आणि त्यांची तब्येत बरी नाही, म्हणूनच ते स्वागताला येऊ शकले नाहीत, असा टोला यावेळी राजू शेट्टींनी लगावला.

COMMENTS