रात्री 11 वाजता मुख्यमंत्री आणि संपक-यांमध्ये चर्चा !

रात्री 11 वाजता मुख्यमंत्री आणि संपक-यांमध्ये चर्चा !

मुंबई – शेतकरी संपाला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे सरकार खडबडून जाग झालं असून त्यांनी संपकरी शेतक-यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. किसान क्रांती मोर्चा आणि इतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वर्षावर बोलावलं आहे. रात्री 11 वाजता ही चर्चा होणार आहे. त्यामुळे या चर्चेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असून या चर्चेतून तरी काही तोडगा निघणार का ? याची उत्सुकता लागून राहिली आहे. एकीकडे सरकार अल्पकर्जधारकांना कर्जमाफी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. त्यावरुन सरकारवर शेतक-यांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे या बैठकीकडं सगळ्यांच लक्ष लागलंय.

COMMENTS