‘शेतकरी कर्जमाफीबद्दल पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन’ !

‘शेतकरी कर्जमाफीबद्दल पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन’ !

बातमीचं हेडिंग वाचून तुम्हाला धक्का बसला असेल ना !  कर्जमाफीबद्दल अजून अंतिम निर्णय काहीही झाला नसताना पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन कसं केलं जात आहे ? हे अभिनंदन आम्ही करत नाही तर भाजपचे कार्यकर्ते करत आहेत. भाजपच्या काही उतावीळ कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी अशी पोस्टर लावली आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जालना जिल्ह्यात असे पोस्टर लावण्यात आली आहेत. तर डोंबिवलीतही अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. शेतक-यांच्या प्रश्नावरुन सरकार एवढं अडचणीत असताना, शेतक-यांचा प्रचंड संताप असताना अशा प्रकारची पोस्टर लावणे म्हणजे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी बांधवातून उमटत आहेत.

 

COMMENTS