पराभवानंतर फडणवीसांचे मोठे विधान

पराभवानंतर फडणवीसांचे मोठे विधान

मुंबई – तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरं, असे विधान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळाले. नागपूर, पुणे याासाख्या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपासाठी हा धक्कादायक निकाल लागले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे २ तर काँग्रेसच्या दोन उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ४ जागा जिंकल्या. तर भाजपाला धुळे-नंदुरबारची एकमेव जागा मिळाली. तसेच  असे असताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेलाही आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाचा किमान एकतरी उमेदवार विजयी झाला. पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीही लागलं नाही. त्यांचा एकही उमेदवार जिंकलेला नाही. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरं. परंतु या तीन पक्षातील केवळ दोघांनाच या निवडणुकीचा फायदा झाला आणि एका पक्षाला मात्र एकही जागा मिळालेली नाही. ज्यांचा राज्यात मुख्यमंत्री आहे, त्यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी आता याचं आत्मचिंतन करावं”, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

COMMENTS