शिवसेना सोडण्याचं कारण, अमोल कोल्हेंनी केला मोठा गौप्यस्फोट !

शिवसेना सोडण्याचं कारण, अमोल कोल्हेंनी केला मोठा गौप्यस्फोट !

पुणे – शिवसेना का सोडली? याबाबतचा गोप्यस्फोट शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला आहे. साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास सांगितल्याने शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असल्याचा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांकडून सातत्याने मला उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी विचारणा होत होती. यालाच मी कंटाळलो होतो, छत्रपतींच्या गादीशी माझ्याकडून गद्दारी होणार नाही, असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं आणि शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचा गौप्यस्फोट कोल्हे यांनी केला आहे.

दरम्यान अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कोल्हे यांना शिवसेना का सोडली याबाबत अनेक जण प्रश्न विचारत होते. या प्रश्नाचं उत्तर आज अखेर कोल्हे यांनी दिलं असून साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास सांगितल्याने शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोल्हे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

COMMENTS