बीडच्या जनतेनं सर्वकाही दिलं मात्र त्यांना काहीच मिळालं नाही , धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे यांच्यावर टीका

बीडच्या जनतेनं सर्वकाही दिलं मात्र त्यांना काहीच मिळालं नाही , धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे यांच्यावर टीका

बीड – बीडच्या जनतेनं भाजपला सर्वकाही दिलं. खासदारकी दिली, आमदार दिले, महत्वाचं मंत्रीपद दिलं, दिल्लीपासून गल्लीपर्यंतची सत्ता दिली. मात्र त्या बदल्यात बीडच्या जनतेला मात्र काहीच मिळालं नाही या शब्दात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

बीडमध्ये काल हल्लाबोल यात्रा पोहचली होती.त्यावेळी आयोजित केलेल्या सभेत धनंजय मुंडे यांनी भाजप आणि पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. घरात खासदारकी आणि महत्वाचं मंत्रीपद दिलं मात्र तुमच्या जीवनात काय बदल झाला असा सवाल धनंजय मुंडे यांनी नागरिकांना केला.

COMMENTS