मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया !

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया !

मुंबई – मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाजपमध्ये सुरु असलेल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर आता भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून  भाजपामध्ये सर्व निर्णय सामूहिक होतात. मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा झाली नसल्याचं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री बदलण्याचे कारणच काय ? असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी माझ्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची जास्त धडपड सुरु असून राज्यात नेतृत्व बदलाची गरज नसून मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री प्रामाणिक प्रयत्न करत आहेत अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच ब्राह्मण मुख्यमंत्री नको, असं कोणाच्याच मनात नाही. कोणाची तरी दुकाने बंद केली असल्यामुळे असले चर्चेचे उपद्व्याप सुरु केले असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS