“भाजपला आंध्र प्रदेशात 0, तामिळनाडू 0, तर महाराष्ट्रात 20 जागा मिळतील ।”

“भाजपला आंध्र प्रदेशात 0, तामिळनाडू 0, तर महाराष्ट्रात 20 जागा मिळतील ।”

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा फटका बसणार असून भाजपला आंध्र प्रदेशात 00, तामिळनाडू 00, तर महाराष्ट्रात 20 जागा मिळतील असा अंदाज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वर्तवला आहे. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात देशातील आठ राज्यांमध्ये 59 जागांसाठी मतदान होणार आहे.

पश्चिम बंगाल हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. कारण, 2014 च्या निवडणुकीत इथे भाजपने फक्त दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे दुसरीकडे होणारं नुकसान बंगालमध्ये भरुन काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. परंतु भाजपला आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत खातही खोलता येणार नसल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीतील हल्ल्यानंतर कोलकात्यात प्रचाराचा कालावधी कमी करण्यात आलाय. यावरुन ममता दीदींनी भाजपवर आरोप करत, हा मोदी-शाह यांचा निर्णय असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS