…त्यामुळे भाजपचे सरकार आले नाही, चंद्रकांत पाटलांची कबुली!

…त्यामुळे भाजपचे सरकार आले नाही, चंद्रकांत पाटलांची कबुली!


सोलापूर – परळीतील मेळाव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरांना इशारा दिला आहे. पक्षाच्या निर्णयाबाबत कुणाचा काही आक्षेप असेल तर पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करा. पक्षशिस्तीचा भंग करू नका. रोज उठून पक्षविरोधी बोलले तर ते खपवून घेतले जाणार नाही. यापुढे कुणाचीही गय केली जाणार नसल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच एकोप्याने वागलो नाही म्हणून राज्यात भाजपचे सरकार आले नसल्याची कबुलीही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान काल भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत पंकजा मुंडे यांनी समर्थकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांनी राज्यातील नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला.
एवढेच नाही तर एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचेही संकेत दिले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. परळीच्या मेळाव्यात काहींनी बंडाची भाषा केली. मतभेद असायला पाहिजेत. पण ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडले गेले पाहिजेत. त्यातून मार्ग काढता येईल. असंही पाटील म्हणाले आहेत.

COMMENTS