लोकसभा निवडणूक नियोजित वेळेतच होणार – मुख्य निवडणूक आयुक्त

लोकसभा निवडणूक नियोजित वेळेतच होणार – मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली –  आगामी लोकसभा निवडणुका या नियोजित वेळेतच होणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक योगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली आहे. भारत -पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील लोकसभा निवडणुकांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु याबाबत मुख्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये निवडणूक आयोगाची बैठक झाली, या बैठकीनंतर अरोरा यांनी लोकसभा तारखांचा संभ्रम दूर केला.

दरम्यान उत्तर प्रदेशातील सर्व 80 लोकसभा मतदारसंघात VVPAT मशिनचा वापर केला जाणार असल्याचंही अरोरा यांनी म्हटलं आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन अर्थात ईव्हीएमवरुन त्यांनी राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे. ईव्हीएम पूर्णत: सुरक्षित आहेत. सुप्रीम कोर्टानेही बॅलेट पेपरने निवडणूक होणार नाही हे स्पष्ट केलं आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमने एक निकाल लागला, मात्र त्याच्या चारच महिन्यांनी दिल्ली विधानसभेत दुसरा निकाल लागला होता, त्यामुळे ईव्हीएमवर संशय व्यक्त करणं चुकीचं असल्याचंही अरोरा यांनी म्हटलं आहे.

COMMENTS