राज्यातील मंदिरं अखेर उघडणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली घोषणा!

राज्यातील मंदिरं अखेर उघडणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली घोषणा!

मुंबई – कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेली मंदिरं अखेर उघडण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.’हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी बाळगा. आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS