पुण्यातील जागांवरुन आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादीचा ‘एवढ्या’ जागांवर दावा ?

पुण्यातील जागांवरुन आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादीचा ‘एवढ्या’ जागांवर दावा ?

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं
जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यातील विधानसभेच्या जागांची चाचपणी करण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आहे. परंतु पुण्यातील काही जागांवरुन आघाडीत बिघाडी होणार असल्याचं दिसत आहे. पुण्यातील 8 जागांपैकी 6 जागांची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. पुण्यातील हडपसर, खडकवासला, पर्वती,वडगाव शेरी,कोथरुड आणि शिवाजीनगर हे सहा मतदारसंघ आपल्याला मिळावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती.  पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत, तर आठपैकी 6 मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या जागा आपल्याला मिळाव्या अशी मागणी केली आहे.

परंतु याबाबत काँग्रेसनेही जागांवरली आपला दावा सादर केला असून आठ पैकी चार जागा लढवण्याची तयारी काँग्रेसनं दर्शवली आहे. पुण्यात काँग्रेसने फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला अवलंबण्याची मागणी केली आहे. मुंबई काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील 8 पैकी 4 जागांची मागणी केली. यामध्ये शिवाजीनगर, कासबा ,कॅन्टोन्मेंट आणि पर्वती मतदारसंघाचा समावेश आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये शिवाजीनगर, कसबा आणि कॅन्टोमेंट मतदारसंघात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा केला जात आहे.

तर पर्वती मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर असलेला सेनेचा तत्कालिन उमेदवार काँग्रेसमध्ये असल्यानं पर्वतीवरही काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे या जागांवरुन काँग्रेस राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु आहे. यावर आता वरिष्ठ नेते काय तडगा काढणार याकडे लत्र लागलं आहे.

COMMENTS