सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत – धनंजय मुंडे

सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत – धनंजय मुंडे

मुंबई – सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत.आपल्या हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी करताना यांना लाजा वाटत नाही का? भाजपच्या नेतृत्वाने या वाचाळवीराच्या नीच वक्तव्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेची ताबडतोब माफी मागावी अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही प्रकरणांतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले. यामध्ये आरे वृक्षतोडप्रकरणी आंदोलन करणारे कार्यकर्ते आणि नाणार प्रकल्पांना विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सरकारच्या या निर्णयावर भाजप प्रवक्ते अवधुत वाघ यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली होती. ‘नशीब…कसाबला फाशी झाली. नाहीतर त्याच्यावरचे गुन्हेही या महाराष्ट्र सरकारने कदाचित मागे घेतले असते…’, असं ट्वीट अवधुत वाघ यांनी केलं होतं. वाघ यांच्या याच ट्वीटला मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

COMMENTS