जिल्हा काँग्रेस कमिटीत बदलाचे वारे, जिल्हाध्यक्ष बदलणार ?

जिल्हा काँग्रेस कमिटीत बदलाचे वारे, जिल्हाध्यक्ष बदलणार ?

उस्मानाबाद – राज्य स्तरावरील काँग्रेस कमीटीत बदल केल्यानंतर आता जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बदलाचे वारे वाहू लागले आहेत.
गेल्या 13 वर्षात काँग्रेस कमिटीने जिल्हाध्यक्षपदाची माळ आप्पासाहेब पाटील यांच्याकडे दिली आहे. अनेक वर्षापांसून इतरांना संधी दिलेली
नसल्याने आता तरी अध्यक्ष बदलणार का, असा प्रश्न कार्यकर्त्त्यांतून विचारला जात आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत पक्षाने चांगली
कामगिरी केली म्हणून जिल्हाध्यक्षपदाची माळ आप्पासाहेब पाटील यांच्याकडे दिली.

दरम्यान मागील तीन वर्षात जिल्ह्यात काँग्रेसला अनेक ठिकाणी हार पत्करावी लागली आहे. अनेक नेते काँग्रेस सोडून जात असताना जिल्हाध्यक्षपदात बदल केलेले नाहीत. अपयश आलेल्या पाटील यांना पदावरून दूर करून नवख्याला संधी देणार का, असा प्रश्न कार्यकर्ते विचारीत आहेत. राष्ट्रवादी तसेच भाजपमध्ये प्रत्येक तीन वर्षात नवीन कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून संधी मिळते. परंतु, काँग्रेस याचा बोध कधी घेणार आहे. नवीन नेत्यांनी जिल्हाध्यक्षपद देणार की वंचीत ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS