विजय मल्ल्याच्या दाव्यावर अरुण जेटलींची प्रतिक्रिया !

विजय मल्ल्याच्या दाव्यावर अरुण जेटलींची प्रतिक्रिया !

नवी दिल्ली – विजय मल्ल्यानं केलेल्या दाव्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतली असल्याचं विजय मल्ल्यानं म्हटलं आहे. परंतु विजय मल्ल्याचा दावा अरुण जेटली यांनी फेटाळला आहे. विजय मल्ल्याचे वक्तव्य तथ्यात्मकरित्या पूर्णपणे खोटे असल्याचं जेटलींनी म्हटलं आहे. २०१४ पासून आतापर्यंत मी मल्ल्या यांची भेट घेतलेली नाही किंवा कधी वेळही दिलेली नाही त्यामुळे त्यांची भेट घेण्याचा प्रश्नच नसल्याचं अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.

दरम्यन  मल्ल्या यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा गैरफायदा घेत माझी भेट घेतली होती. याप्रकरणी मी त्यांना वेळ देण्याचा प्रश्नच नव्हता असं जेटलींनी म्हटलं आहे. मल्ल्या जेव्हा राज्यसभा सदस्य होते. तेव्हा ते अपवादत्मकरित्याच संसदेत येत. ते एकदा संसदेच्या कामकाजावेळी अनौपचारिकत्या माझ्या खोलीकडे आले होते. त्यावेळी त्यांनी मी तडजोडीसाठी एक प्रस्ताव तयार करत असल्याचे सांगितले. हे बोलणे पुढे नेण्यापूर्वी मी त्यांना त्यांच्या यापूर्वीच्या प्रस्तावाबाबत आठवण करून दिली. तसेच हा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवण्यात काहीच अर्थ नसल्याचं मी त्यांना बोललो होतो असंही जेटली यांनी म्हटलं आहे.

COMMENTS