ग्रामीण भागातील जनतेच्या सुखकर प्रवासासाठी प्रयत्न – परिवहन मंत्री ॲड.अनिल परब

ग्रामीण भागातील जनतेच्या सुखकर प्रवासासाठी प्रयत्न – परिवहन मंत्री ॲड.अनिल परब

मुंबई – ग्रामीण भागातील जनतेला ‘एसटी’च्या माध्यमातून चांगल्या सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरक्षित, जलद, सहज प्रवासी व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, असे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले. काल मंत्रालयात परिवहन विभागाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ॲड.परब बोलत होते.

ॲड. परब म्हणाले, महाराष्ट्राची लाईफलाईन म्हणून एसटी बससेवेकडे पाहिले जाते. यासाठी ही बससेवा सुरळीत, नियमित सुरु ठेवण्यासाठी आपण सर्वांनीप्रयत्न करावेत. एसटी महामंडळांनी प्रवाशांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त प्रवास सुखकर कसा करता येईल याकडे अधिक लक्ष द्यावे. ग्रामीण भागातसुद्धा वातानुकुलीत सेवा सुरु करण्यासाठी महामंडळांनी विचार करावा आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुखकर प्रवास सुविधा उपलब्ध करुन द्यावी.

दरम्यान परिवहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक भरती संदर्भातील नियुक्तीचा आढावा घेण्यात आला. त्यात भरती प्रक्रिया सुरु असताना समांतर आरक्षण या न्यायालयाच्या निर्णयानुसार नव्याने दिलेल्या सूचनांमुळे निवड होऊन सुद्धा नियुक्ती पासून वंचित राहिलेल्या 118 उमेदवारांच्या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करुन या उमेदवारांना न्याय देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. असे आश्वासनही ॲड. परब यांनी दिले. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, महाव्यवस्थापक (वाहतूक) राहूल तोरो उपस्थित होते.

COMMENTS