आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?, राष्ट्रवादीचा भाजपला सवाल !

आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?, राष्ट्रवादीचा भाजपला सवाल !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं भाजपवर जोरदार टीकी केली आहे.  रणजितसिंह मोहिते- पाटील तसेच सुजय विखे- पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर ही टीका करण्यात आली असून  राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत भाजपाविरोधात बॅनर लावले आहेत.
“ज्यांना आम्ही नाकारले,हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले,गोंजारले, आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?”, अशी टीका या बॅनरद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईत ठिकठिकाणी हे बॅनर लावले आहेत. याद्वारे भाजपवर बोचरी टीका केली आहे. “ज्यांना आम्ही नाकारले,हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले,गोंजारले, आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?”, असा सवाल राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टीनं केला आहे.

COMMENTS