आणखी एका पक्षाची निवडणूक लढवण्याची घोषणा, 25 – 30  उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात !

आणखी एका पक्षाची निवडणूक लढवण्याची घोषणा, 25 – 30 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे. कारण या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनंतर मराठा क्रांती ठोक मोर्चा एण्ट्री मारणार आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा आबासाहेब पाटील, रमेश केरेपाटील यांनी केली आहे. 25 – 30 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच उद्याचा मुख्यमंत्री मराठा समाजाचा झाला पाहिजे ही आमची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणानंतरही आता मराठा क्रांती ठोक मोर्चा सरकारच्या भूमिकेवर समाधानी नसल्याचं दिसत आहे.

दरम्यान आरक्षण मिळालं असलं तरी मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून केला जात आहे. केंद्रात आणि राज्यात मराठा लोकप्रतिनिधी समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत नाहीत त्यामुळे ठोक मोर्चा येणाऱ्या निवडणूकीत उमेदवार उभे करणार आहे. तसेच कोपर्डी घटनेतील आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर ताबडतोब अंमलबजावणी करावी, लागू झालेल्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी, आण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी द्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक याबाबत सरकारने भूमिका अधांतरी ठेवली आहे त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आलं आहे.

COMMENTS