आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, अनेक मुद्दे गाजणार !

आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, अनेक मुद्दे गाजणार !

नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान देशभरातील विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे हे अधिवेशन चांगचलं गाजणार असल्याचं दिसत आहे. दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक घेऊन पावसाळी अधिवेशनात सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे. त्यामुळे या अधिवेशनादरम्यान विरोधक शांततेनं कामकाज पार पडू देणार का हे पाहणं गरजेचं असणार आहे.

दरम्यान मागासवर्गीय आणि दलितांच्या आरक्षण प्रश्नावरुन समाजवादी पक्षाचे नेते आक्रमक आहेत. याबाबत जाब विचारण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्यामुळे हा मुद्दा अधिवेशनात गाजणार असल्याचं दिसत आहे. तसेच शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, महागाई  आणि मॉब लिंचिंगप्रकरणी पहिल्यादिवशीच स्थगन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्षांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांशी पावसाळी अधिवेशनासंदर्भात चर्चा केली आहे. यावेळी सभागृहातील विविध चर्चांमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले, त्यास सर्वांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS