…तर ते मावळ लोकसभा मतदारसंघाचा काय विकास करणार ? – पार्थ पवार

…तर ते मावळ लोकसभा मतदारसंघाचा काय विकास करणार ? – पार्थ पवार

पुणे – मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना त्यांनी दत्तक घेतलेल्या खोपटे गावाचा विकास करता आला नाही, तर ते मावळ लोकसभा मतदारसंघाचा काय विकास करणार अशी टीका पार्थ यांनी केली आहे. मावळ मतदार संघातील नेरे गावात आयोजित करण्यात आलेल्या संवाद सभेत पार्थ पवार बोलत होते.

दरम्यान मी प्रचाराच्या निमित्ताने मतदारसंघात फिरत असताना प्रत्येक मतदार हा मागील पाच वर्षात खासदारांना पाहिलेच नाही असे सांगत आहे. खासदार हे फक्त संसदरत्न पुरस्कार घेण्यासाठी खासदार झाले का असा प्रश्न कधी कधी मला पडतो. मावळ मतदारसंघात विकास हा शून्य आहे. या मतदारसंघात रेल्वे, पाणी, प्रकल्पग्रस्त, रस्ते, विमानतळ, रेडझोन असे अनेक प्रश्न आहेत. सत्ता असूनही जर हे प्रश्न विद्यमान खासदारांना सोडवता येत नसतील तर आता या खासदारांना घरी बसवण्याची वेळ आली असल्याचही पार्थ पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS