शेतकय्रांसाठी मोदी सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय?

शेतकय्रांसाठी मोदी सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय?

नवी दिल्ली – देशातील शेतकय्रांसाठी मोदी सरकार ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.पंतप्रधान मोदी हे तब्बल ४ लाख कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. या कर्जमाफीचा २ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यातील अपयशामुळे हादरलेल्या मोदी सरकारकडून हा ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.यापूर्वीच्या यूपीए सरकारनेही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. पण त्या कर्जमाफीच्या तुलनेत मोठी कर्जमाफी मोदी सरकार करु शकते.तसेच तळागाळातील जनतेला आकर्षित करण्यासाठी सरकारच्या वतीने अनेक ठोस पावले टाकले जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी, युवक, मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी सरकार पावले उचलणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यासाठी आर्थिक तरतुदीचे मोठे आव्हान मोदी सरकारसमोर असणार आहे. कारण मागील सहा महिन्यात जीएसटीमार्फत निश्चित करण्यात आलेले उत्पन्न गाठण्यात फक्त दोनवेळाच यश आले आहे.त्यामुळे या निर्णयाचा फायदा मोदी सरकारला होणार का हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS