पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली ‘ही’ मागणी !

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली ‘ही’ मागणी !

नवी दिल्ली – कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान मोदींना लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची विनंती केली आहे. लॉकडाऊन न वाढवल्यास भयावह परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच या बैठकीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी देशातील रेल्वेसेवा सुरु केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. रेल्वेसेवा ताबडतोब बंद करावी. तसेच ३१ मेपर्यंत विमानसेवाही बंद ठेवावी, अशी मागणीही तामिळनाडू व तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आगामी काळातही राज्यांनी आपल्या लक्ष्यापासून न ढळता सक्रियपणे काम केले पाहिजे. शहरातून गावापर्यंत कोरोना पोहोचू नये, याची काळजी घ्यायला हवी. लोक घराकडे निघाले आहेत हा मानवीय भाग आहे. घराकडे जाण्याची ओढ असते. लोक अडकल्यामुळे काही नियम शिथिल करावे लागले. परंतु ग्रामीण भागात कोरोना पोहोचणार नाही, याची खबरदारी घ्या, असा सल्लाही मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

COMMENTS