काँग्रेसच्या घराणेशाहीवर पंतप्रधान मोदींची जोरदार टीका !

काँग्रेसच्या घराणेशाहीवर पंतप्रधान मोदींची जोरदार टीका !

रायपूर छत्तीसगड येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीच्या नावाने गळे काढणाऱ्या काँग्रेसने फक्त पाच वर्षांसाठी गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तिला अध्यक्ष करावं तरच पंडित नहरूंनी लोकशाही खरी तत्व रूजवली असं मी मान्य करतो असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. नेहरूंमुळे चहावाला पंतप्रधान झाला असं काँग्रेसचे लोक म्हणताहेत.त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी फक्त पाच वर्षांसाठी गांधी घराण्याबाहेरच्या  व्यक्तिला काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नेमावं. तरच नेहरूंनी खरी लोकशाही तत्व रूजवली असं मी मानतो असही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटल आहे. ते छत्तीसगड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीचा प्रचारसभेत बोलत होते.

दरम्यान एक चहावाला पंतप्रधान झाला हे अजुनही काँग्रेसला पचलेलं नाही. पहिले ते तुच्छतेनं म्हणायचे एक चहावाला पंतप्रधान झाला, आता ते म्हणतात की नेहरूंमुळे चहावाला पंतप्रधान झाला. साडेचार वर्ष झाली तरी काँग्रेसचं रडगाणं अजुन संपलेलं नसल्याची टीकाही यावेळी मोदींनी केली आहे. तसेच चहावाला पंतप्रधान झाला याचं श्रेय मोदींचं नाही आणि भाजपचही नाही, ते यश या लोकशाहीचं असल्याचंही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS