मध्य प्रदेश निवडणूक, भोंगळ कारभाराबद्दल तहसिलदाराचे निलंबन

मध्य प्रदेश निवडणूक, भोंगळ कारभाराबद्दल तहसिलदाराचे निलंबन

मुंबई – मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भोंगळ कारभाराबद्दल तहसिलदाराचे निलंब करण्यात आले आहे. मतदानाचा कालावधी उलटून गेल्यानंतर राखीव मतदान यंत्र (इव्हीएम) मुख्यालयात पोहोचल्याने या तहसिलदाराचे निलंबन करण्यात आले आहे.यावरुन  काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली. यावर मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी कांताराव यांनी सर्व मतदान यंत्रे सुरक्षित आणि सीलबंद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान खुरईहून सागर या जिल्ह्याच्या ठिकाणी ३७ राखीव इव्हीएम पाठवण्यात आली होती. या दोन शहरांमधील अंतर २५ किमी असून एका स्कूलबस मधून ही मतदान यंत्रे पाठवण्यात आली होती. मात्र, हे अंतर कापण्यासाठी या बसला तब्बल दोन दिवस लागले. या बसवर कोणताही नोंदणी क्रमांकही नसल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसनं भाजपवर टीका केली आहे. भाजपा बेकायदा पद्धतीने निवडणूक यंत्रणेचा उपयोग करीत असून या गंभीर प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस आमदार अरुणोदय दुबे  यांनी केली आहे.

COMMENTS