काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा!

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा!

पंढरपूर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व 48 जागा लढवणार असल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी करण्यास इच्छुक होती. त्यासाठी  काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची भेटही घेतली होती. परंतु ही भेट अखेर निरर्थक ठरली असून आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष महाराष्ट्रातील सर्व 48 जागा लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून धनगर समाजाचे नेते अॅड. विजय मोरे यांची उमेदवारीही आज जाहीर केली आहे. जागावाटप हा मुद्दा मोठा नव्हता. एमआयएमबद्दल आक्षेप होता. तो ही मुद्दा ओवीसींनी संपवला असताना काँग्रेस आघाडीसाठी तयार नाही. तसेच काँग्रेसला दिलेला 30 जानेवारी पर्यंतचा अल्टीमेटमही आता संपला आहे. त्यामुळे आता जिथे सभा होईल तिथे उमेदवार घोषित करणार असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS