पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान गोंधळ, चौदा मिनिटात उरकावं लागलं भाषण !

पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान गोंधळ, चौदा मिनिटात उरकावं लागलं भाषण !

पश्चिम बंगाल – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान गोंधळ उडाला असल्याचं पहावयास मिळालं आहे. ठाकूर नगर येथील रॅलीमध्ये हा गदारोळ झाला असून यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अवघ्या चौदा मिनिटात  आपलं भाषण उरकावं लागलं आहे. ममता बॅनर्जींवर टीका करण्यास सुरुवात केल्यामुळे लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली तसेच रॅली असलेल्या ठिकाणी एकच गदारोळ झाला. पोलिसांनीही ही गर्दी आवरण्याचा प्रयत्न केला मात्र लोकसंख्या जास्त असल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना माइकवरून आवाहन करत शांत रहाण्याचे आवाहन केल मात्र लोकांनी मोठ्याप्रमाणावर गदारोळ करण्यास सुरुवात केली. मोदींच्या भाषणादरम्यान झालेल्या गर्दीत काही लोक जखमीही झाले. या जखमींना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले आहे.

COMMENTS