विधानसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींचं मोठ वक्तव्य!

विधानसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींचं मोठ वक्तव्य!

पुणे – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. राज्यामध्ये माझ्याशिवाय विधानसभा निवडणूका लढवण्यास सक्षम असे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात ४९ ठिकाणी उमेदवार उभे केले जाणार असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप आणि शिवसेना सोडून अन्य पक्षांबरोबर चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे खुले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत राज्यात आम्ही महाआघाडीचा भाग होतो त्यामुळे जागा वाटपासंदर्भात काही जर निर्णय घ्यायचा असेल तर महिनाभरात घ्यावा. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्य कार्यकारणीची बैठक घेऊन आम्ही यादी जाहीर करू व निवडणूकीच्या कामाला सुरूवात करणार आहोत. त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय त्या अगोदरच घ्या असंही शेट्टींनी म्हटलं आहे.तसेच पुढील काळात प्रत्येक कार्यकर्त्याने तालुका, जिल्ह्यात संघटनेचे काम वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

COMMENTS