कठुआसारखी घटना लाजीरवाणी – राष्ट्रपती

कठुआसारखी घटना लाजीरवाणी – राष्ट्रपती

नवी दिल्ली – कठुआत घडलेल्या बलात्काराच्या घटनेबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अखेर मौन सोडलं असून अशाप्रकारच्या घटना लाजिरवाण्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे झाली तरीही देशाच्या कुठल्याही भागात कठुआ अत्याचारासारखी घटना घडणे ही बाब अत्यंत लाजीरवाणी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कुठल्याही महिलेवर किंवा मुलीसोबत असे प्रकार घडू नयेत, ही आपली जबाबदारी असून आपण कुठल्या प्रकारचा समाज विकसित करीत आहोत असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान  देशातील अनेक भागात अनेक निष्पाप मुलींना अशा घटनांचा सामना करावा लागत आहे. ही खूपच लाज आणणारी गोष्ट असून या जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे एखाद्या चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हास्य, त्यामुळे आपली जबाबदारी आहे की या निष्पापांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन दिलं पाहिजे असंही कोविंद यांनी म्हटलं आहे.

COMMENTS