बिहार – एनडीएला सोडचिठ्ठी देणा-या उपेंद्र कुशवाह यांना धक्का, पक्षातील आमदारांची बंडखोरी !

बिहार – एनडीएला सोडचिठ्ठी देणा-या उपेंद्र कुशवाह यांना धक्का, पक्षातील आमदारांची बंडखोरी !

नवी दिल्ली – बिहारमधील राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांना जोरदार धक्का बसला आहे.त्यांच्याच पक्षातील आमदार बंडखोरीच्या तयारीत आहे. याबाबत आज आरएलएसपीचे विधानसभेतील आमदार सुधांशू शेखर आणि ललन पासवान तसेच विधान परिषदेतील आमदार संजीव सिंह शाम यांनी आपण एनडीएमध्ये असल्याचे जाहीर केले आहे. आपण अजूनही भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक असल्याचे त्यांनी जाहीर केले. उपेंद्र कुशवाह यांनी व्यक्तीगत हितासाठी एनडीएबरोबर काडीमोड घेतल्याचा आरोप संजिव सिंह यांनी केला आहे.

दरम्यान आरएलएसपीचे बिहारमध्ये कुशवाह यांच्यासह तीन खासदार आणि तीन आमदार आहेत. एनडीएचा भाग असलेले राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी काही दिवसांपूर्वीच एनडीएला सोडचिठ्ठी देताना केंद्रीय राज्यमंत्रीपदाचाही राजीनामा दिला होता. बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयूमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यापासून उपेंद्र कुशवाह नाराज होते. आपल्या पक्षाला अपेक्षित जागा मिळत नसल्याची त्यांनी तक्रार केली होती. याच नाराजीतून त्यांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. परंतु आता त्यांच्याच पक्षात बंडखोरी होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे कुशवाह यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

COMMENTS