राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमत्त शरद पवारांनी केला ‘हा’ निर्धार !

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमत्त शरद पवारांनी केला ‘हा’ निर्धार !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 20 वा वर्धापनदिन आहे. या वर्धापनदिनानिमत्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निर्धार केला आहे. मुंबईमध्ये पक्षाचा विस्तार वाढवायला पाहिजे हे खरं आहे. राष्ट्रवादीचा चेहरा ग्रामीण केला आहे हे खरं असून यात काही चुकीचं नाही. मात्र 50 टक्के लोकं शहरात रहातात. प्रत्येक तालुक्यामध्ये नागरीकरण झालेलं बघायला मिळेल. तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून संबंध राज्यात आपण यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आजच्या दिवशी आपण निर्धार करूया की नागरीकरण झालेल्या भागांत पक्षाची व्याप्ती वाढली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करूयात. नागरी प्रश्नांसाठी आपण संघर्ष करायला पाहिजे, लोकांबरोबर उभं राहिलं पाहिजे. असं पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुंबईत आपण थोड्या जागा लढवतो. मात्र यावेळी किंवा विशेषतः महानगरपालिकेच्या वेळी जास्तीत जास्त कार्यकर्ते यांना संधी दिली पाहिजे तर पक्ष वाढेल. अनेकांना संधी मिळाली पाहिजे. आता एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. जेव्हा आपण 20 वर्षांपूर्वी पक्ष स्थापनेनंतर सत्तेत आलो तेव्हा अनेक तरुणांना संधी दिली, पहिल्यांदा मंत्री झाले. सर्व फळी तरुणांची होती.यामुळे पक्षाचा विस्तार होण्यास मदत झाली. आता विचार करायला पाहिजे की आता संघटनेच्या ठिकाणी किती नवीन फळी आहे ? याची मला काळजी आहे. जास्तीत जास्त तरुणांना संधी दिली पाहिजे असंही यावेळी पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS